Monday, 10 September 2012

ती आली आणि गेली...आठवण तेवढी राहिली..




    कवितेचे अनेक पैलू असतात. पण खरच एखादी कविता एखाद्या व्यक्तीला कितपत कळली आहे हे शोधून काढायला एकही साधन नही. पण तरीही हजारो कवी त्यांच्या कविता इतरांना ऐकवण्याचे धाडस करतातच. ज्याला समजली ते त्याचे अथवा कवीचे नशीब...

माझा देखील एक असाच प्रयत्न ...




होती धुंद पाऊल वाटेवरती
तिची चाहूल विरत गेलेली
गर्द धुक्याने नकळत जिला
सर्वांगी मुक्त चुम्बीलेली
ओला पाऊस होता वेडा
पाठलाग करत गेलेला
ओझरत्या स्पर्शाने तिच्या
वाटेवरचा केवडा शहारलेला
उन्मळून वेलीवरचे फुल
ऐकलेच मनाशीच हसलेले
नुकतेच कुणीतरी ज्याला
मृदुल पाउली ठेचलेले
इंद्रधनुचे रंग लेवूनी
फुलपाखरू बागडलेले
भाळून कांतीस जिच्या
उन्मत्त अन् वेडावलेले
साक्ष देती खुणा साऱ्या
तिचीच ओळख पटलेली
भिरभिरते नजर शोधण्या
भेटून हि जी न भेटलेली....